White लग्न कर आणि मोकळा हो
असं सगळेच म्हणतात मला
असेल कुणी बघितलेली तर सांग
घेऊन येऊ तिलाच बोलतात मला..
वाटतं तितकं सोपं नसतं ना
तरी लोकांचं बोलणं कळतं मला
घेऊन येऊ बोलणं सोपं असतं
पण मनात नसताना आणायचं कोणाला?
लग्न म्हणजे दोन दिवसांचा कार्यक्रम नव्हे
कारण,आयुष्य कसं असतं कळतं मला
मरेपर्यंत Adjust करावं लागतं ना
कसं सांगावं हे ह्या समाजाला...
लग्न म्हणजे बाहुला बाहुली चं खेळ नाही
सारं काही पटवावं लागतं मनाला
घेऊन येऊ तिला म्हणणं सोपं वाटतं इतरांना
पण, कळेल कसं जातीपातीच्या कचाट्यात सापडलेल्या समाजाला...
माणूस सोडून सारं काही बघतात इथे
महत्व फक्त जातपात श्रीमंती नोकरी आणि पैशाला
हवी अशी मुलगी आयुष्यात कायमची
सगळं सोडून जी येईल फक्त महत्व देऊन मला...
प्रेम इथे कोणावरही केलं जातं काहीच न बघता
पण खूप काही बघितलं जातं लग्नाला
जग एका बाजूने आणि माझे मत वेगळे
म्हणून घाई करून कष्ट नको माझ्या मनाला...
वय वाढत जातं जिम्मेदाऱ्या वाढतात
आणि हे सगळंच कळतंय मला
पण, लोकांना वाटतं तितकं सोपं नसतं
हल्ली खूप काही हवं असतं लग्नासाठी मुलाकडून मुलीला....
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here