श्रीमंती, जात, सुंदरता काय बघायचं
जोडीदार तर मनासारखा असला पाहिजे
हे सारं काही क्षणिक असेल तुमच्यासाठी
शेवटपर्यंत फक्त प्रेम कायम असला पाहिजे...
सुविधेच्या जगात शरीर विकलांग होईल तर
तेव्हा एक घास प्रेमानं भरवणारा असला पाहिजे
नसला जवळ काही तरी जगता येईल आनंदाने
फक्त जोडीदाराचा मन सुंदर असला पाहिजे...
उपयोग करून सोडणाऱ्या आताच्या काळात
निःस्वार्थ भावनेने नातं जपणारा असला पाहिजे
सारं जग जरी झाला आपल्या विरुद्ध
अशावेळी जगाशी लढणारा जोडीदार पाहिजे...
महालाचं काय झोपडीत ही सुखानं झोपता येते
दोघांचं मन फक्त समाधानी असला पाहिजे
नाहीतर लाख भेटतील ही सोयी सुविधा
पण आयुष्यात आनंद ही असला पाहिजे...
सगळं काही तात्पुरतं च आहे इथे
पण नात्यातील गोडवा कायम असला पाहिजे
म्हणून नको श्रीमंती, सुंदरता अनं काही
आनंदी आयुष्यासाठी जोडीदार मनासारखं असला पाहिजे
©कधी प्रेम कधी विरह
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here