असलो जरी मी आज एकटा..
आली भरून तिन्हीसांज ही
मन हे तयात रमुनी जाते..
अवकाशातील रंगांमध्ये
जणू पाखरु न्हाऊनी जाते..
शोधत होतो अवकाशी या
फक्त माझेच एक पाखरु..
कायम राहा तू सोबत माझ्या
नकोस दुसरा हात धरू..
या सृष्टीवर असंख्य चेहरे
पण..
कोणीच माझ्या सोबत नाही..
दूर जात्या आधाराला मन हे
आता चिंतत राही..
पण..
असलो जरी मी आज एकटा
मन हे माझे खंबीर आहे
कारण..
सत्यदिन तो घेऊनी भास्कर
उद्या नव्याने उगवत आहे..
🏮सायांकाच्या कविता🏮
8055120315
©व्यंकटेश विनायक कुलकर्णी
#Nightlight